शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! तार कुंपणावर 90% अनुदान – लगेच अर्ज करा

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी “शेतासाठी तार कुंपण योजना” सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना 90% पर्यंत अनुदान मिळणार असून शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना खूप उपयोगी ठरणार आहे.

योजनेचे फायदे

  • पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होऊन उत्पादन वाढते.
  • शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होते.
  • तार कुंपणामुळे जनावरे व चोरट्यांपासून पिके सुरक्षित राहतात.
  • चांगल्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात वाढ होते.

आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

  • शेतकरी ओळख क्रमांक (महाडीबीटीसाठी)
  • जात प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • ग्रामपंचायतीचा दाखला समितीचा ठराव
  • जमीन मालकी हक्क अथवा भाडेतत्त्वावरील करारपत्र
  • वन अधिकाराचा दाखला (जर लागू असेल)
  • स्वघोषणापत्र

पात्रता व अटी

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • शेत जमीन मालकी हक्काची किंवा भाडेतत्त्वावर असणे आवश्यक.
  • अतिक्रमणमुक्त जमीन असावी.
  • पिकांचे नुकसान होणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना प्राधान्य.
  • अर्ज करताना ग्रामविकास समिती/संयुक्त वन समितीची संमती आवश्यक.